तरूण भारत तालुका प्रतिनिधी यांचे निधन
संग्रामपूर न्यूज

संग्रामपूर येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच तरुण भारत न्यूजपेपर चे संग्रामपूर तालुका प्रतिनिधी श्री रवींद्र दांडगे यांचे हृदयविकार आल्याने निधन झाले.
त्यांच्याकडे स्वामी विवेकानंद सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष पदाची जबाबदारी होती बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच सामाजिक कामत अग्रेसर असल्यामुळे संपूर्ण विभागात त्यांची ख्याती होती
संगत गुण ते सोबत गुण ह्या म्हणी नुसार काही प्रमाणात त्यांना दारूचे व्यसन सुरू झाल्याचे समजते शनिवार दिनांक २९/०६-२०२६ रोजी गंमत गंमत मधे नशेत त्यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते
अल्प प्रमाणात विषारी औषध प्राशन केल्याचे समजताच घरच्यांनी तातडीने वरवट बकाल येथील सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी हलविले तिथे उपचार करून डॉक्टरांनी निश्चिंत राहण्याचे आवाहन केले प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले अचानक रात्री २ वाजता पोटात वेदना होत असल्याने डॉक्टरांनी शेगाव साईबाई मोटे रुग्णालयात रेफर केले सकाळपर्यंत त्यांना सलाईन चालू होत्या तिथे सुद्धा प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले
अचानक सकाळी ७.५५ ला त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला त्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांच्या निधनानंतर परिसरात अचानक स्मशान शांतता पसरली गावात हळहळ व्यक्त होत होती सर्व पत्रकार बंधुना अचानक शॉक बसला.
सायंकाळी चार वाजता त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला.
Discover more from Maharashtra Gramin
Subscribe to get the latest posts sent to your email.


