डिझेल पेट्रोल चे भाव वाढले











*मेळघाटच्या विस्थापनावर विदर्भ प्रांत वनवासी ग्रामीण मजदूर महासंघ घालणार लक्ष*.. मेळघाट मधील कामगार तथा मजदूर यांच्या होत असलेल्या प्रचंड प्रमाणातील विस्थापन याबाबत भारतीय मजदूर संघ अंतर्गत येत असलेल्या विदर्भ प्रांत वनवासी ग्रामीण मजदूर संघ या प्रकरणाकडे लक्ष देणार आहे. मेळघाट मधून हजारोंची संख्येने आदिवासी मजदूर रोजगार मिळत नसल्याने रोजगाराच्या शोधात वेगवेगळ्या जिल्ह्यात व राज्यांमध्ये विस्थापित होतात त्या ठिकाणी त्यांचे शोषण होते अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार केले जातात अशा घटना उघडकीस आल्या आहेत याकरिता या प्रश्नाकडे विदर्भ प्रांत वनवासी ग्रामीण मजदूर संघ लक्ष घालणार आहे असे प्रतिपादन असंघटित क्षेत्राचे केंद्रीय प्रभारी भारतीय मजूदूर संघाचे नेते जयंतराव देशपांडे यांनी धारणी येथे आयोजित अखिल भारतीय वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात केले.16 व 17 मे रोजी धारणी येथील हरीगोविंद छात्रावास येथे हे अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशना नंतर अखिल भारतीय वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाच्या राष्ट्रीय कार्य समितीची बैठक सुद्धा संपन्न झाली. या अधिवेशन समयी मंचावर अखिल भारतीय वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राधूसिंगजी भाबर,असंघटित क्षेत्राचे प्रभारी दिल्ली निवासी जयंतराव देशपांडे राष्ट्रीय महामंत्री कृष्णकुमार बैगा, राष्ट्रीय संयुक्त महामंत्री प्रकाशजी बोदडे,धारणी पूर्व तालुका संघचालक रतनलालजी परिहार यांची उपस्थिती होती. या अधिवेशनात तीन ठराव पारित केले ठराव 1 मेळघाट मधून मजदूर विस्थापित होऊ नये याकरिता शासन प्रशासनाने याच भागात त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करावी. 2 मेळघाट व्याघ्र प्रकल्प यामधून पुनर्वसित झालेल्या आदिवासी बंधू करिता पंधरा लाख देण्याचे शासनाने कबूल केले होते त्यामध्ये केवळ दहा लाख रुपये दिल्या गेले रोहन खिडकी आंबा बरवा गुमठी शेम्बा या गावातील 402 लोकांचे पाच पाच लाख रुपये बाकी आहेत सरकारने या पैशांची व्यवस्था करावी.3 प्रवासी मजदूर किंवा विस्थापित होत असलेल्या कामगार मजुरांकरीता त्यांचे होत असलेले शोषण अन्याय अत्याचार यावर प्रतिबंधाकरिता याकरता सरकारने प्रवासी श्रमिक आयोगाची निर्मिती करावी त्यामुळे होणाऱ्या अन्याय थांबविता येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय आभार राष्ट्रीय संयुक्त महामंत्री प्रकाश बोदडे यांनी केले. अधिवेशनात ठरावावर विस्तृत चर्चा झाली व आगामी तीन महिन्यांमध्ये विस्थापित मजदुरां सोबत संपर्क साधण्यात येईल व यावर तातडीने मुख्यमंत्र्यांशी भेट घेण्यात येईल.धारणी येथील अधिवेशनात अखिल भारतीय वनवासी ग्रामीण मजदूर महासंघाची प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली त्यामध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून शिवरामजी धांडे चिखलदरा अमरावती,प्रदेश कार्याध्यक्ष सुरपालजी रावत जळगाव खा.महामंत्री नंदूभाऊ बामणे,संयुक्त महामंत्री राजूदादा बामणे, बुलढाणा उपाध्यक्ष सौ.शेमतीताई कासदेकर,अशोकराव केदार, प्रदेश मंत्री सौ.जयाताई खंडारे धारणी,कोषाध्यक्ष श्री चिमकर प्रदेश सदस्य संगीता दहिकर जामली,ब्यानसिंग बारेला मोहपाणी अकोला, सत्यनारायण बंडीवार अहेरी गडचिरोली,श्यामजी गँगराडे धारणी,क्षमाताई चौकसे, लोकेशजी धनेवार, मनोहर चौबीसा यांची नियुक्ती करण्यात आली.



जाहिराती करिता तसेच आपल्या परिसरातील बातम्या पाठविण्या करिता संपर्क
राजेंद्र दांडगे मुख्य संपादक महाराष्ट्र ग्रामीण लाईव्ह जनता की आवाज न्यूज़ २४ चॅनेल
मोबाईल क्रमांक 9890304577
8669035637









*भेंडवडची मांडणी*2026
पिके
*कापूस पिक* *प्रेस्टीज बी जी 2* चागले
ज्वारी पिक:- साधारण
भावात चांगले
*सोयाबीन :- नयना*
तूर पिक: – अनीचीत
मुंग पिक: – सर्वसाधारण
उडीद पिक :- रोगराई
तील पिक :-चागले
भादली :- रोगराई जास्त
बाजरी पिक :- चांगले
तांदूळ पिक:- चांगले
मठ पिक सर्व- साधारण
जवस् पिक:- नासाडी
लाख पिक:- मोगम
वाटाणा पिक:- अनीचित
गहू पिक: – साधारण
हरबरा:- साधारण/मोगम
*देश*
नैसर्गिक आपत्ती संरक्षण खाते मजबूत राहील
परकीय देशाचा त्रास राहील
आर्थिक परिस्थिती वाईट
राहील
*पाऊस*
*जुन* कमी ☁️
*जुलै* साधारण जून पेक्षा जास्त🌦️
*ऑगस्ट* अतिरुष्टी 🌧️⛈️
*सप्टेंबर* चांगला अवकाळी पाऊस⛈️
सोयाबीन:- *नयना, हिमानी



रा.स्व.संघ शाखेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम. बुलढाणा दि.१४ एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कामगार विषयक दृष्टिकोन हा आर्थिक सामाजिक व राजकीय या त्रिकोणावर आधारित होता. ते कामगारांना केवळ वेतन मिळवणारे श्रमिक मानत नव्हते तर स्वाभिमान सन्मान आणि समान हक्क असलेला मानवी घटक मानत होते. आज भारतातील अनेक कामगार कायदे डॉ. आंबेडकरांच्या दूरदृष्टीचे फळ आहे. त्यामुळे ते केवळ वंचित मुक्ती दाता नव्हते तर ते खऱ्या अर्थाने भारतीय कामगार चळवळीचे शिल्पकार होते. असे प्रतिपादन भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रांताध्यक्ष रवींद्र गणेशे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नगर शाखेच्या वतीने येथील विष्णूवाडीतील शारदा मंदिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .मंचावर सामाजिक कार्यकर्ते अँड. साहेबराव सरदार ,नगर संघ चालक महेश पेंडके व प्रमुख वक्ते रवींद्र गणेशे यांची प्रमुख उपस्थिती होती. रवींद्र गणेशे पुढे म्हणाले की प्रबोधन व परिवर्तन प्रक्रियेची चौकट मोडून सामाजिक क्रांतीची वाटचाल बहुजन समाजा पर्यंत नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महात्मा फुलेंनी केली. त्यांच्या या कार्याला छत्रपती शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचे समर्थन व सक्रिय साथ लाभली. तर महर्षी वी.रा. शिंदे यांचे योगदान ही महत्त्वपूर्ण होते. परंतु प्रबोधन व परिवर्तनाची ही चळवळ समाजाच्या तळागाळातील व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची क्रांतिकारी कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. या चळवळीचा वाटचालीला निर्णायक वळण देऊन शेवटच्या टप्प्यापर्यंत नेऊन ठेवले. संघ प्रचारक स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या एका पुस्तकात बाबासाहेब आंबेडकरांच्या दिल्लीतील भाषणाची साक्ष देताना सांगितले की डॉ. आंबेडकर व डॉ.हेडगेवार या दोघांचीही कार्यपद्धती अलगअसली तरी दोघांची दिशा व गंतव्य स्थान हे एकच होते.या राष्ट्रात सामाजिक समरसता प्रस्थापित करणे हा या दोघांचाही जीवित हेतू होता. त्यामुळे संघाला अभिप्रेत असलेली सामाजिक समरसता ही बाबासाहेबांना सुद्धा अभिप्रेत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आपलेपणा होता. याचे अनेक ऐतिहासिक दाखले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या समतेच्या आणि बंधुतेच्य मार्गावरून चालत आपण एक समर्थ ,सुवर्ण व सशक्त भारत घडवू असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन नगर कार्यवाह रवींद्र जाधव यांनी केले. अमृत वचन प्राध्यापक रिठे यांनी सादर केले या कार्यक्रमाला नगरातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता अनंत उबाळे यांच्या भीमवंदनने झाली.



*आदिवासी म्हणजे आदी सत्य सनातन हिंदु धर्माचे वासी*..श्री.संत रामचरण महाराज
(१४ मार्च रोजी वसाली येथे भव्य फगवा संमेलन संपन्न)
आदिवासी म्हणजे आदि सत्य सनातन हिंदु धर्माचे वासी आहेत असे प्रतिपादन शबरीधाम अंबा आश्रम मध्य प्रदेश येथील श्री संत रामचरण महाराज यांनी फगवा संमेलनात काढले.सदर संमेलन होळी नंतर फगवा एक लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो.हे भव्य फगवा संमेलन १४ मार्च रोजी वसाली ता.संग्रामपूर येथे वनवासी सेवा समिती जामोद व फगवा उत्सव समिती वसाली द्वारा आयोजित केले होते.दुपारी १२ वाजता वीर हनुमान जी यांचे आरती नंतर हनुमान मंदिरा समोर कार्यक्रमाला सुरुवात झाली.पुढे संत रामचरण महाराज म्हणाले की,आदिवासी बंधू भगिनी प्रभू श्रीराम,भगवान श्रीकृष्ण,भगवान भोलेनाथ यांचे वंशज आहेत.आम्ही वनात राहतो म्हणून आम्हाला वनवासी सुध्दा म्हणतात.आम्हाला आमचा सनातन हिंदु धर्म अतिशय प्रिय आहे. ‘कंधो से उची छाती नही होती,धर्म से बडी कोई जाती नही होती दीपक ही नही बचा तो बाती का क्या करोगे,सनातन हिंदू धर्म ही नही बचा तो जाती का क्या करोगे’ हिंदू धर्मावर होणाऱ्या आक्रमणाबाबत त्यांनी सगळ्यांना सतर्क राहण्याबाबत सांगितले.जे भारत मातेला आपली माता मानत नाहीत ते आमचे नाहीत.ख्रिश्चन मिशनरी यांना गावात प्रवेश करू देऊ नका,त्यांच्या शाळेत आपल्या मुला मुलींना पाठवू नका.अन्य धर्मीय लोकांच्या काळ्या कारवायाकडे लक्ष द्या,स्वतःच्या धर्मात मरण आले तरी बेहत्तर परंतु पर धर्म स्वीकारू नका असे आवाहन त्यांनी केले.२२ मे रोजी दिल्ली लाल किल्ला येथे आयोजित संघ परिवार क्षेत्राच्या डिलीस्टिंग मोर्चा मधे सामील होण्या बाबत त्यांनी सूचना केली.यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष वनवासी सेवा समिती जामोद चे अध्यक्ष गणेश जी नथ्थाणी हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून वि.हि.प.चे विदर्भ प्रांत संघटन मंत्री विष्णूजी देशमुख,बुलढाणा विभाग संघचालक चित्तरंजनजी राठी खामगाव जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे,वनवासी कल्याण आश्रमाचे गजाननराव सोलकर, वि.हि.प.चे राजेशजी झापर्डे,गोविन्दजी बर्डे आदी मान्यवर मंचावर होते.प्रमुख वक्ते देशमुख म्हणाले की स्वामी विवेकानंदांनी सांगितल्यानुसार हिंदु धर्मातून एक संख्या कमी झाली तर एक संख्या कमी होत नाही तर एक शत्रू वाढतो त्यामुळे देव देश धर्म कार्यासाठी सगळ्यांनी एकत्रित यावे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र बोदडे,आभार प्रदर्शन राजूभाऊ गांधी यांनी केले.या कार्यक्रमाला वसाडी येथील सरपंच सिकंदर बाबर,मिलिंदजी जोशी, सचिनभाऊ देशमुख,प्रकाश बोदडे, प्रदीपभाऊ भुतडा,ओमजी संघवै,विश्वासभाऊ पाटील,विजय दहीकर,भाऊराव पाटील,शालिग्राम मानकर,रामेश्वर चोरे,अतुलजी बनारसे,विष्णू खडसे,जगदीशप्रसाद तिवारी,मगन माली,सोहन डूडवा, धनसिंग,कालू रावत व विश्व हिंदु परिषद,बजरंग दल,वनवासी कल्याण आश्रम,भारतीय मजदूर संघ व परीवार क्षेत्रातील विविध आयामाचे शेकडो कार्यकर्ते व हजारो चे वर वनवासी बंधू भगिनी उपस्थित होत्या.




*आ.डॉ.कुटे यांचे वाढदिवसानिमित्त भाजपा महिला मोर्चा सोनाळा द्वारे वृक्षारोपण*…९ मार्च रोजी जळगांव जा.मतदार संघाचे लोकप्रिय आमदार व मा.मंत्री डॉ.संजयजी कुटे यांचे वाढदिवसानिमित्त भाजपा महिला मोर्चा सोनाळा द्वारा शिक्षक कॉलनी येथे वृक्षारोपण करण्यात आले.डॉ.कुटे साहेबांना दिर्घ आयुष्य लाभो व त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो अशा शुभकामना महिला मोर्चा द्वारे या भगिनींनी दिल्या.९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सोनाळा येथील शिक्षक कॉलनी येथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला गेला.भाजपा महीला मोर्चा व नवदुर्गा महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रम नेहमी राबविले जातात. वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे त्यामुळे समाजात पर्यावरणाबद्दल जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे असे मत सौ.वैशालीताई बोदडे भा.ज.पा. तालुका सरचिटणीस महिला मोर्चा यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला सौ.ज्योतीताई लव्हाळे संचालक खरेदी विक्री सहकारी संस्था मर्या.संग्रामपूर,श्रीमती पंधाडे,सौ.जनाताई भास्कर,श्रीमती तलोकार,सौ.वनमालाताई सुलताने, सौ.पार्वतीताई घट्टे,सौ. सुनिताताई राजनकर,सौ.शोभाताई गोतमारे,सौ.दिपालीताई पवार श्रीमती गोतमारे आदी महीला वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.



