Uncategorized
राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय दिलासादायक निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र ग्रामीण जनता की आवाज लाइव्ह न्यूज चॅनेल

राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय दिलासादायक निर्णय घेतला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार आता थेट गावागावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत करण्यात येणार आहे.
यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारांसाठी शहरात धावपळ करावी लागणार नाही.
किरकोळ शस्त्रक्रिया, तपासण्या आणि प्राथमिक उपचार आता गावातच मोफत मिळणार आहेत.
आतापर्यंत केवळ मोठ्या रुग्णालयांपुरती मर्यादित असलेली योजना आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे.
ग्रामीण नागरिकांचा वेळ, पैसा आणि त्रास वाचणार आहे.
वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ पात्र कुटुंबांना मिळणार आहे.







